कोल्हापूर : सामाजिक परिवर्तन, संविधान मूल्ये आणि पुरोगामी विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले पहिले कॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांना अभिवादन करण्यात आले.
संमेलनात रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्या समवेत डॉ. भारत पाटणकर, मदन पवार, विश्वास तरटे, सुनील जाधव, डॉ. कपिल राजहंस, अनिल म्हमाने, अंतिमा कोल्हापूरकर, विद्रोही कवी पी. के. तसेच अॅड. करुणा विमल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली.
समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद आणि अन्यायाविरोधात पुरोगामी चळवळी अधिक मजबूत करण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमास विविध सामाजिक, पुरोगामी व युवक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या