सामंजस्य करार प्रसंगी प्रा.संजय ठिगळे, प्राचार्य डॉ. रविंद्र कुपवाडे, प्रमोद चौगुले, डॉ.सुभाष पाटील, अभिजित पाटील, वर्षा चौगुले, कुलदीप देवकुळे, डॉ. प्रविण चौगुले आदी मान्यवर..
प्रतिष्ठा न्यूज सांगली प्रतिनिधी : तरुणाई आणि साहित्य क्षेत्रातील विविध घटकांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर त्यांच्यात लेखन कौशल्य विकसित व्हावे यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगली आणि लठ्ठे एजुकेशन सोसायटीचे कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सामंजस्य करार प्रसंगी
सामंजस्य कराराचा हेतू मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ.सुभाष पाटील यांनी सांगितला.
या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेचे अध्यक्ष प्रा.संजय ठिगळे म्हणाले की, साहित्य संस्कार आणि साहित्य संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला पाहिजे. साहित्य चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी साहित्य परिषद अनेक स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयाशी सामंजस्य करार करीत आहे.
महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट करताना प्राचार्य डॉ. रविंद्र कुपवाडे म्हणाले की,सामंजस्य करारा अंतर्गत पुढच्या पाच वर्षात साहित्य परिषदेच्या व महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
संस्थेची भूमिका विषद करताना प्रमोद चौगुले म्हणाले की, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी साहित्य चळवळीतील विविध उपक्रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.
या प्रसंगी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष वास्तू विशारद प्रमोद चौगुले, कार्यवाह अभिजित पाटील, वर्षा चौगुले, कार्यकारिणी सदस्य कुलदीप देवकुळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रविण चौगुले त्याचबरोबर मराठी भाषा विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या