प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:डेरवन (चिपळूण) येथे नुकत्याच पार पडलेल्या ४०व्या महाराष्ट्र ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धा-२०२६ मध्ये तासगावातील स्वराज्य फाउंडेशन व पी.जी. स्पोर्टसच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करत खेळाडूंनी तासगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत तासगावच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची, मेहनतीची आणि जिद्दीची प्रभावी छाप उमटवली.सिद्धी पाटील हिने हॅमर थ्रो या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.रिद्धी पाटिल हिने ४×४०० मीटर रिलेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या यशात मोलाची भर घातली.मुब्बसीरा मुल्ला हिने ५००० मीटर चालणे या कठीण क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करत तृतीय क्रमांकाचे कांस्यपदक मिळवले.तिच्या या यशामुळे तासगावच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.कमला चौधरी हिने आपल्या अष्टपैलू कामगिरीची झलक दाखवत ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.याशिवाय ४×४०० मीटर रिलेमध्येही द्वितीय क्रमांक मिळवत तिने दुहेरी यश संपादन केले.
आयुष्का धोत्रे हिने 4+400 मीटर रिलेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे
राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेले हे यश खेळाडूंच्या सातत्यपूर्ण सरावाचे, कठोर परिश्रमाचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित मानले जात आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनाही योग्य प्रशिक्षण, संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राज्यस्तरावर आपली क्षमता सिद्ध करू शकतात, हे या कामगिरीतून अधोरेखित झाले आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे स्वराज्य फाउंडेशन व पी.जी. स्पोर्टसच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच तासगाव शहरासह परिसरातील क्रीडाप्रेमी, पालक आणि नागरिकांकडूनही या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आगामी स्पर्धांमध्येही या खेळाडूंनी अशीच दमदार कामगिरी करून तासगावचे नाव राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या