सांगली, दि. 6 (जि. मा. का.) : सन २०२५ साठीच्या विविध राज्यस्तरीय कृषि पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे इच्छुक शेतकरी, संस्था किंवा गटांनी दिनांक 20 मार्च 2026 अखेर सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
यापूर्वी कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने द्यावे लागत होते. यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असे. ही प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी आता https://krishi.maharashtra.
ऑनलाइन प्रणालीचे फायदे
शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येईल, चार प्रतींमध्ये प्रस्ताव तयार करण्याचा वेळ आणि खर्च वाचेल, एकदा अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा देण्याची गरज नाही, अर्जाची सद्यस्थिती शेतकऱ्यांना सहज कळू शकेल, छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्च कमी होणार असून आर्थिक भार कमी होईल.
या पुरस्कारांसाठी करता येईल अर्ज
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या