नवी दिल्ली : महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकावर आज संसदेत मतदान पार पडले. मात्र आवश्यक बहुमत न मिळाल्याने हे विधेयक नामंजूर झाले. हे विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतियांश म्हणजेच 360 मतांची गरज होती, परंतु प्रत्यक्षात विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर विरोधात 230 मते नोंदवली गेली.
संसदेतील एकूण 540 सदस्यांपैकी 528 सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला. त्यामुळे विधेयक मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा 62 मतांची कमतरता राहिली आणि विधेयक फेटाळले गेले.
या विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोधकांचा विरोध होता. विधेयक नामंजूर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. Rahul Gandhi यांनी महिला आरक्षणाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, 2023 मध्ये मंजूर झालेल्या विधेयकाच्या अंमलबजावणीची मागणी केली. तर Priyanka Gandhi यांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख करत सरकारवर टीका केली.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी या पराभवाला तात्पुरता अडथळा मानत, विधेयक पुन्हा मांडून मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची भूमिका व्यक्त केली आहे.
महिला आरक्षण व डिलिमिटेशन विधेयक नामंजूर होणे हे Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या