तासगाव:समाजात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या तासगाव येथील स्वामिनी वुमेन्स् फाऊंडेशनच्या वतीने समाजातील सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.यावेळी बोलताना स्वामिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तसेच तासगाव नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान बांधकाम समिती सभापती सौ.दिपालीताई दिग्विजय पाटील यांनी सांगितले की,आजच्या समाजव्यवस्थेत महिलांचे योगदान कुटुंब व्यवस्थेत पुरुषांच्या बरोबरीने वाढले आहे.तरीही महिलांवर होणारे अन्याय,अत्याचार आणि विविध क्षेत्रातील गळचेपी लक्षात घेता महिलांनी अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.यासाठी महिलांनी कायद्याचे ज्ञान घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमात उपमुख्याध्यापिका राजश्री भोसले,डॉ.प्रियदर्शनी कदम, प्रा.सुजाता घोरपडे,उद्योजिका सौ. गीता डिसले आणि सौ.स्वाती जाधव यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमात स्वामिनी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा सौ.स्वाती माळी,सचिव सौ.मधुरा टिंगरे, सौ.यामिनी बियाणी, डॉ. प्रियदर्शनी कदम व सौ. स्वाती जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी निकीता कदम,सविता माळी,रसिका आडसुळ,दिपाली माळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आभार डॉ.चेतना साळुंखे यांनी मानले.
“‘ती’ उभी राहिली म्हणून समाज उभा आहे;तासगावच्या स्वामिनी फाऊंडेशनकडून महिलांचा सन्मान”
By -
मार्च ११, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या