सांगली, दि. 21 जून : आजच्या धकाधकीच्या जीवनात धनसंपत्तीपेक्षा शरीरसंपत्ती अधिक महत्त्वाची असून निरोगी आरोग्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर इनामदार यांनी केले.
जागतिक योग दिनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान, अँब्सील्यूट फिटनेट सेंटर आणि स्त्री सखी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्रामबाग येथे योग दिनाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनिल रुईकर यांनी भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील योगसाधनेचे महत्त्व विशद केले.
यानंतर अँब्सील्यूट फिटनेट सेंटरच्या प्रमुख अर्चना कुलकर्णी यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, ओमकार साधना तसेच दंड स्थिती, बैठक स्थिती, शयन स्थिती आणि विपरीत स्थितीतील विविध योगप्रकारांचे मार्गदर्शन केले. शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात स्त्री सखी महिला मंडळाच्या श्रुती जोशी, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज (नाना) पाटील, धनेश कातगडे, शशिकांत टेके, नगरसेवक युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, दरिबा बंडगर, नगरसेविका कीर्ती देशमुख, सुहास तम्मा ऐवळे, रोहित जगदाळे, योगेश कापसे, चंद्रकांत घुणके, अमित गडदे, श्रीकांत वाघमोडे, अजय देशमुख, माजी नगरसेवक संजय कुलकर्णी, सविता मदने, माजी नगरसेवक बालाजी काटकर, सुनील मानकापुरे, विशाल भगत, महेश मजगे, प्रथमेश वैद्य यांच्यासह श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, 50 हून अधिक योगप्रेमींनी ऑनलाइन माध्यमातूनही सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत नियमित योगसाधना करण्याची शपथ घेतली. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
निरोगी जीवनशैलीचा संदेश देत विश्रामबाग परिसरात जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या