प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.१९ : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि सुशासनाच्या आदर्शांचा गौरव केला. महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून रयतेच्या कल्याणासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. सामाजिक समता, स्त्रीसन्मान, धर्मनिरपेक्षता आणि सुशासन यांचे मूल्य समाजात रुजविण्याचे कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य श्री. प्रकाश(तात्या) बिरजे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे केवळ राज्यव्यवस्था नव्हे तर जनतेच्या कल्याणाचा ध्यास होते. त्यांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा निर्धार आपण सर्वांनी करावा. राष्ट्रहित, समाजहित आणि पारदर्शक प्रशासन यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शेवटी सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्याचा आणि त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश(तात्या) बिरजे, ज्येष्ठ नेते श्रीकांत(तात्या) शिंदे, जिल्हा सरचिटणीस विशाल पवार, स्वीय सहाय्यक अमोल कणसे, नगरसेविका योगिता राठोड,माजी नगरसेवक संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, दीपक कर्वे, गौस पठाण, प्रशांत राठोड,उदय भडेकर, आबा जाधव,श्रीधर जाधव,सूरज कोळी, राजू मद्रासी,आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या