कडेगांव (प्रतिनिधी) :
वेलांटीचा घेऊन पदर, लाजते मनात मराठी, उकारांचे घालून पैंजण मनामनात वाजते मराठी अशी शालीन भाषा मराठी , आहे राजस कुलवंत मराठी असे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या कवी सायराबानू चौगुले यांच्या कवितेला रसिक श्रोत्यांनी उस्फुर्त पणे प्रतिसाद दिला निमित्त होते मराठी भाषा दिनाचेच राज्यस्तरीय निमंत्रिताचे कवी संमेलन कडेपूर येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी निमंत्रितांच्या कवी संमेलनात पांडुरंग माळी यांच्या कवितेतून व लोककलेतून समाज प्रबोधन, परिवर्तनाचा वारसा याही अंधकवी चंद्रकांत देशमखे काव्यमंचावर निमंत्रित कवींनी कायम ठेवला. प्रारंभी कडेपूरच्या जयश्री यादव या "कवडसा" कवितेत म्हणतात की झाकोळलेल्या दुनियेत माझ्या, प्रकाशाचा एक कवडसा, मी शोधतो आहे, दीन अंध अपंगाच्या, जीवासाठी मदतीचा एक , हात तुम्हास मागतो आहे , अशी अंधव्यक्तीची व्यथा कवितेतून मांडली आहे. "कर्तव्य "या कवितेत पुणे घ्या कांचन मून म्हणतात की संतापरी भक्ती जीवनात, थोरा सम हवी कार्यशिलता, संविधानाचे वाच पान तू, आचरणात पंचशील जग मानवता, असे संविधान वाचवण्याचे कर्तव्य समाजानेच करावे असा संदेश दिला. दौंडच्या अनिसा सिकंदर शेख मराठी भाषेविषयी गझलेत म्हणतात की पिढ्या दर पिढ्यांनी जपावी मराठी , अशी अंतरात भिडावी मराठी, मराठी शिकाया विनवते अनिसा, चहू या दिशांना फिरवी मराठी सांगलीच्या दयासागर बन्नेनी "धडपडत्या हातांना "कवितेत म्हणतात की रक्तात सळसळावी वीज, असं बोललं पाहिजे, भूकंपाने हादरावी धरती, तसं काळीज हललं पाहिजे , धड आहे तोवर करत राहावी, आपण धडपड, धडपणीने जग हे घडते, आयुष्याची थांबे पडझड, असे म्हणत समाजातील सर्व पडझडीवर मात करण्यासाठी प्रत्येकाने धडपड केली पाहिजे असा संदेश कवितेतून दिला आहे पुण्याच्या सीताराम नरकेनी अजित दादांना कवितेतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले की असे कसे गेलात हो ,
पोरकी करत माती , दादा तुमच्या जाण्याने, निखळली सारी नाती, काहीच न राहिले हाती , या भावपुर्ण कवितेने वातावरण रसिक भावनाशील झाले. पुण्याचे बाबाजी मगदूम यांनी "आई" ही गझल सादर केली यात उपाशी झोपते आई, स्वतःच्या लेकरासाठी, कशी लपून ती भाकर, जरा ठेवी उद्यासाठी, किती आशा निराशाही, मुलाच्या जाणते आई, फुटे पान्हा भरे अमृत, भुकेलेल्या पिलासाठी, असे म्हणत आईची मुलांवर असलेली माया काव्यातून प्रभावीपणे सादर करुन आईचेच हुबेहूब चित्र रसिकांसमोर उभे केले. पुण्याचे विनोद अष्टूळ यांनी सर पटतय तुमचं सारपणं , आमचं नशीब एक नंबर, आम्ही गांवात पट्टीचे थोर, आमचा व्यसनावर लय जोर, म्हणतच खेड्यातील व्यसनाधीनता झालेल्या तरुणाईचे वास्तव कवितेतून समाजासमोर मांडले.कराडच्या विजया पाटील यांनी नकोस समजू हीन, दीन अन् मजला, मी झाझीची राणी, आता माझ्यासाठी , डॉ विजया पवार या" नवी ओळख" कवितेत म्हणतात की वेगळे काही करुन जावं , आयुष्य हे जगताना, ओळख मागे उरावी, दुनियेतून या जाताना , असे वास्तववादी चिञण सादर केले. कविसंमेलनाध्यक्ष पदावरुन बोलताना भीमराव धुळुबूळु म्हणाले की "साहित्यिकानी ही मराठी भाषा समृद्ध ज्ञान भाषा व्हावी यासाठी सर्वस्तरावरुन प्रयत्न करणे गरजेचे आहे . मराठी एकीकडे अभिजीत भाषा होत आहे.तर दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत .मराठीत मुले शिकली नाहीत.तर ती मागे पडतील हा न्यूनगंड समाजाने काढून टाकावा कारण आज मराठी भाषेत शिकणारी मुले सर्व स्तरावर आघाडीवर आहेत. मराठीचे प्राध्यापक व मराठी शाळेतील शिक्षक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवत आहे. हीच आजची शोकांतिका आहे. लेखक कवींनी वास्तववादी भिडणारे लिखाण करून समाजामध्ये परिवर्तन करावे".धुळुबुळ कवितेत म्हणतात की कशाला धर्म जातीने, चळाया लागला आता, अशाने देश माझा हा, जळाया लागला आता असे म्हणतच समाजातील वास्तववादी
चिञण सादर केले . सु धों मोहिते, शबनम मुल्ला, यांनी ही कविता सादर केल्या. या काव्याच्या अक्षरपेरणीच्या शब्दांलंकरानी भरलेली ही मैफिल कवितेच्या सर्व प्रकारांना स्पर्श करून उत्तरोत्तर रंगत गेली .कवींच्या अनोख्या सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. समाजातील विषमतेवर बोट ठेवणारी कविता रसिकांच्या पसंतीला उतरली. हे कवी संमेलन कडेपूरच्या पुढच्या दीर्घकाळ कायमचेच लक्षात राहणारे ठरेल हे माञ निश्चित!
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या